कागदावर पहिला शब्द उमटला आणि माझा जन्म झाला. माझ्या सुज्ञ पित्याने विद्वान पण्डितांकडून माझी जन्मपत्रिका काढवली असेलच, तसेच जन्माच्या वेळी असलेले ग्रह-नक्षत्र पाहुन माझे नाव ही ठेवण्यात आले असतिल. ’संस्कार ब. परिणाम’ हे माझे पूर्ण नाव. पित्याचे नाव श्रीयुत "बदलते"! जरी थोडे हास्यास्पद असले, तरी काळानुरुप माणसावर त्याच्या जीवनखण्डात झालेले संस्कार हे केवळ जग बदलत चालले आहेत म्हणून बदलावे ही मनीषा नाही, असोत. जाति ’निबंध’, गोत्र ’मुक्तछंद’ आणि आडनावाला धरुनच वाचकाच्या मनावर खोचक परिणामकारक ठरणे हाच श्रेयसकर धर्म. हा माझा संक्षिप्त परिचय. माझा मलाच होणारा उपयोग, बहुधा त्रास ही, माझ्यामुळे अनेकांच्या आयुष्यात घडणारे बदल, मी नसल्याने जीवनातले व्याप-व्याधी, असल्याचे महिमान-कोडकौतुक , सद्यःस्थिती आणि त्यातून उत्पन्न मनाला विषण्ण करणारी, विभत्स वैफल्यै. थोडक्यात संस्कारी व असंस्कारी दोनी बाजूंचा उलगडा करत करत मी माझा जीवनप्रवास तो उपसंहारास पोहोचवून, माझ्यावर शेवटचा संस्कार होण्यापूर्वी ह्या सचेत-सदेह आणि माझ्या आयुष्याचा मी स्वतः प्रस्तावक ह्या भूमिकेतूनही, वाचकमनाला जाऊन थेट भिडणे, तसेच त्याच्यावर आपले संस्कार करूनच, ठेवलेला कागबली गिळू देइन..
संस्काराची एक ओंगळ परिभाषा म्हणजे "चांगला मुलगा", (मुलगीही), पण थोडे गहन अर्थ पाहिलेत तर संस्कार हे सार्थक जीवन जगणे, इतकेच नाहीततर आयुष्य सुंदर पध्दतीने जगायचे असलेत तर संपूर्ण जीवनचक्रात पावलो-पावली अवती-भवती असलेल्या छोट्या-लहान सर्वगोष्टीतून लाभलेले त्या-त्या गोष्टीतले श्रेष्ठ गुण आपल्या जगण्यात वागण्यात ग्रहण करत जाणे असा होतो. अबोध बालमनावर त्याच्या जन्मापासून तो जे काही पाहतो-ऐकतो ग्रहण करतो, मग ते त्याच्या आईकडून, पित्याकडून, आजी-आजोबांकडून विशेष ,घरातल्या इतर मोठ्या व्यक्तिंकडून, शेजार-पाजारहून, शाळेतून आणि अगदी आपल्या लहान सवंगड्यांकडूनही, त्याचा एक दाट कधीही फिका न पडणारा ठसा उमटत जातो, जो त्याच्या संपूर्ण आयुष्यात तो पुढे समाजात वावरताना, कसा मुलगा?, भाऊ?, शिष्य?, मित्र?, पति?, पीता? नागरिक? थोडक्यात माणूस? हे ठरवतो. मनुष्य ह्या प्राण्याला माणसात आणन्याचे कार्य हे त्याच्यावर झालेले संस्कारच करतात. मनुष्यातले संस्कारच त्याला कळसास पोहोचवतात तर तसेच रसातळाला नेण्यासाठीही कारणीभूत ठरतात.
जीवन जगण्यासाठी एक पध्दत आपल्या पूर्वजांनी सांगितली आहेत, त्यात काळाप्रमाणे आवश्यक ते बदल हे गरजेचे आहेतच, पण त्या-त्या जीवनपध्दतीचे वैशीष्ट्य जपणे ही आपलेच कर्तव्य आहे. संस्कॄति आणि संस्कार हेच माणसाची ओळख असते, तेव्हा "काळाची गरज" ह्या पाटी खाली मनमर्जीपणे सारे टाकत जाणे हे सर्वस्वी अस्विकार्य आहेत. संस्कृति जपली तर त संस्कार येतील, संस्कृतिच नाही तर संस्कार कसे राहतिल. अलीकडे माता-पिता रोजच्या कलागतित एवढे रममाण झालेले असता येणाऱ्या पिढ्या घडविण्याचे कार्य हे खूप मागे राहुन गेले आहे. देशात लोकसंख्या तर उमाप वाढत चालली आहेत, पण त्यात माणूस कितीसे आहेत? हा प्रश्न मनाला विषण्ण करतो. माता-पिता कर्तव्यमूढ होत चाललेले आहेत ह्यात तिळभर शंका नाही. पैश्याने संस्कार विकत घेता आले असते तर मोठ-मोठे पैसेवाले लोक वृध्दापकाळी आसरा शोधत फिरताना आढळले नसते, ते त्यांच्या तरुणाईत कर्तव्यासी मूकले, आणि म्हणूनच हे परिणाम.
कधी-कधी माला स्वतःला ही वाटतं मी इतका संस्कारी राहुन काय मिळविले? माझ्या मित्रांच्या यादीमधे नेहमी "संतोष-प्रिती" ही गरीब घरची संस्कारीत मण्डलीच सामिल असायची! ते थोडे शीष्ट श्रीमंत लोक "यश-किर्ती" आमच्यासारख्यांकडे डुंकून ही कधी पाहत नसे. अच्छा नकोत पण त्यांच्यातला उर्मटपणा त्यांना कधीच वक्री गेला नाही, आम्ही जरा कुठे मनासारखं वागायचं नुसते ठरवताच तोण्डघाशी पडलोत. जे नियमांना धरुन चालतात त्यांचेच हाल का? हे कोडे आजतागायत सुटलेले नाही आहे. पण ज्यांनी कधीच ही संस्कारांची चौखट स्विकारली नाही, तेच अधिक सुखी, पाहुन मनात जर एकेकाळी असुया उत्पन्न होत असली, तरीही आजवरचे जीवन आणि झालेले संस्कार वायाच गेले!! नाही का..?? संस्कारांचे महत्व एवढ्याचसाठी आहेत कि ते माणसाला पशुवॄत्ति कडे जाण्यापासून परावृत्त करुन जीवनाच्या महत्वांच्या वळणावरती जीवाचे मार्गदर्शन करतात. ॠषी-मुनिंच्या सहस्त्र वर्षांच्या उपासनेचा सार हेच "संस्कार" रुपात आपल्या पावतो पोहोचले आहेत, आणि ते पुढल्या पिढी पावतो पोहोचविण्याचे कार्य वर्तमान पिढीने जिद्दीने करावेच. संपूर्णपणे ही नियोजित जीवनशैली नाकारणे असला मुर्खपणा करण्याचा अट्टाहास बाळगणारे वेळेआधीच सावध झाले तर मिळवलं.
’संस्कार’ ह्या अग्निहोत्रात प्रथम आहुतिचा मान ’संसार’ ह्या पवित्र यज्ञमण्डपाची अधिष्ठधात्री देवी आदिशक्तिचा आहेत. सामान्य मातीला आकारुन त्यातून विभिन्न कला-कौशल्याने परिपूर्ण असलेलं व्यक्तिमत्व घडविण्याचे कार्य "आई" हीच करु शकते, नाहीततर जगात प्रल्हाद, राम, शीवबा, विवेकानन्द , तिळक आणि असंख्य हे जन्मले तर असतेच पण जनमानसापावतो पोहचले नसते. प्रत्येकाचीच आई, आईपण जाणवताच आपल्या कर्तव्याचे पालन जिद्दीने करत असते, पण आम्ही-तुम्ही सामान्य लोक ती तिच्यातली जिद्द आपल्या आयुष्यात ह्या संसाररुपी मायाजाळात अडकून टिकवून ठेवत नाही आणि म्हणूनच ’सामान्यच’ ठरतो!
पाळण्यातले संस्कार झाले काय नाही काय एकच, तरी जाणत्यावयीचे मुंज-लग्न आणि अंत्यविधी सुध्दा फक्त दिखावा बनून राहिले आहेत, त्याचा उपयोग हा कवडीचा ही नाही. मुंज झालेले कितीसे मुलं त्रिकाळ संध्या करतात? त्यांना संध्या काय हे तरी महिती आहेत का? हाच प्रश्न आधी. लग्नमण्डपी स्वखुषीने सावधान झालेले गाजा-बाज्यासह कोर्टाची पायरी चढताना ही दिसतातच! अंत्यविधी ही तेवढी आपल्या हातात नाही! तरी ती का? कश्यासाठी जरुरी आहेत हे तरी आम्ही जाण्यापूर्वी सांगितली होती का? आम्हालाच कुठे माहिती त्याबद्दल! आणि म्हणूनच ह्या जगात लोकसंख्या वाढतीये कारण मुक्तीचे मार्ग कुणालाच सापडत नाहीये, येर-झारा तो चालूच आहे आणि चालूच राहणार! म्हणून स्वतःच्याच मुक्ततेचा विचार करता संस्कार जतन करा..
एक अजुन नुसतेच मुलं नाही मुलींनाही नियमाने वागायला शिकवा, त्यांना सीतामाईचे, झाशीच्या राणीचे-बहिणाबाई, अहिल्याबाई होळकर, ह्या सारख्या असंख्य स्त्रीयांचे आदर्श शिकवा. इंदिरा संत-शांता शेळके ह्यांच्या कवितेची गोडी लावा. मुलांना तर पुष्कळ ठिकाणी आजही संस्कार ह्या बेडीने बांधून ठेवले आहेत, मुलीही बांधा. जगात वायुवेगाने पसरत चाललेली अस्थिरता कुठेतरी थांबवायची असली तर मुलींना आवरा! हे मी चांगल्या हेतुनेच बोलतोय, त्याचा सारासार विचार न करता, माझ्या दारावर जगभर असलेले स्त्रीमुक्ति संगठणं हातात काळ्या पाट्या घेऊन एकत्रीत होण्याची गरज नाही. एकत्रीत व्हायचेच असले तर "संस्कार-जतन करण्याच्या" हेतूने व्हा. तीच काळाची गरज आहे. उघड्या डोळ्याने दिसणारे आणि अंतरचक्षूंनी दिसणारे परिणाम ह्यांना सुंदर वळण देण्याचे सामर्थ्य हे तुमच्यातच आहे. पुरुषांना ते जमेल हे वाटत नाही. किंबहुना प्रकृति-पुरुष मिलन नवे संस्कार घडवतिल.
मनुष्याचे जीवन हे अकल्पित आहेत. जन्म आणि मॄत्युवर त्याचा अधिकार नाही, हो पण ह्या दोन टोकांमधला कालखण्ड हा सर्वस्वी त्याच्याच स्वाधीन आहेत, त्याच्या अधिकारक्षेत्रात येतो. म्हणून निर्णय सावधपणे आणि कलाकुसरीने घ्या, जेणेकरुन नुसतेच तुमचे नाहीत तर तुमच्या अवती-भवती असलेल्यांचेही आयुष्य सुंदर वळण घेतील. एक-एक मिळूनच अवघे विश्व सुंदर होतील, उन्नत होतील. फिरत्या चाकावरची माती ही सुंदर आकार आपच घेत नाही! एक अदृष्य कलाकार त्याही मागे असतोच असतो. ’संस्कार’ जीवनाला सुंदर आकार देणारे तेच अदॄष्य हात आहेत...
...........चेतन पद्माकर फडणीस, देवास